मुंबई- बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार असून चार जूनला गुणपत्रिका मिळणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार, २७ मे रोजी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांची प्रिंट आऊट घेता येणार असून चार जून रोजी चार वाजता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार आहेत.
बारावीला सर्व शाखांमधून १३ लाख ३९ हजार ९९ विद्यार्थी बसले आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई,अमरावती,नाशिक, लातूर व कोकण या राज्यातील नऊ विभागांचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. गुण पडताळणीसाठी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
तर ऑक्टोबर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यापासून १५ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams