विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील रहिवासी माजी सैनिक मारूती खोत यांनी गेल्या चार दशकांच्या कालावधीत तब्बल ७ कोटी ८२ लाख ४५ हजार वेळा श्रीरामाचा नामाचा जप करीत २३५ वह्यामध्ये नामलिखाण केले आहे. ही त्यांची रामभक्ती अयोध्यामध्ये होत असलेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने औत्सुक्याचा विषय ठरली आहे.
विठुरायाचीवाडी गावचे मारुती खोत (वय ६६) हे सैन्यदलात होते. तेव्हापासून त्यांनी श्री राम लिहत जप करायला आणि श्री राम नामजपाचे पाठ करायला सुरुवात केली. ९ मे १९८१ रोजी खोत यांनी सैन्यात सीमेवर असतानाच मिळेल त्या वहीमध्ये श्री राम लिहायला सुरुवात केली. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर खोत यांनी अधिक जास्त वेळ नाम जप करायला सुरुवात केली. आजही खोत यांचे लिखाण सुरू आहे.
