ठाणे : उत्तन येथील घनकचरा भूमीला भीषण आग

उत्तन येथील पालिकेच्या घनकचरा भुमीत साचलेल्या कचऱ्याला शनिवारी रात्री आठच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे संपूर्ण परिसरात आगीचे लोट उडू लागले आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे.

भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मिरा भाईंदर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकल्पात कचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प झाली असल्यामुळे सुमारे साडे आठ लाख टन कचऱ्याचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिला आहे.अश्या परिस्थितीत शनिवारी रात्री आठच्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.आगीची माहिती मिळताच घटना स्थळी अग्निशमन विभागाच्या चार गाड्या उपस्थितीत राहिल्या असून आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर मागवले जात आहेत.

ही आग कचऱ्यामध्ये निर्माण होणाऱ्या मिथेन गॅसमुळे लागली असून ती वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाढत जात आहे. त्यामुळे येत्या दोन तासातच आगीवर नियंत्रण मिळण्याची मोहीम आखण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *