भारत सरकारने नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले आहेत. सप्टेंबर महिन्यात या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो येथील उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्ता भारतात आणण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे.
अफ्रिकेतून लवकरच १२ ते १४ चित्ते भारतात आणण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात चित्ते भारतात येतील. याबाबत भारत सरकारने नामीबिया सरकारसोबत एक करार केला आहे. संसदेत माहिती देताना अश्विनीकुमार चौबे यांनी म्हटलं आहे.
प्रोजक्ट टायगरअंतर्गंत भारतात चित्त्यांच्या घरवापसी करण्याच्या उपक्रमावर ३८.७ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. ही परियोजना २०२१-२२ ला सुरू होऊन २०२५-२६ पर्यंत चालणार आहे, असंही अश्विनीकुमार चौबे यांनी म्हटलं आह
सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेले ८ चित्ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांच्यावर २४ तास नजर ठेवण्यात येत आहे. १७ सप्टेंबरला नामिबियातून आठ चित्ते मध्ये प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्त्यांना नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं. या चित्त्यांना त्यांचं नवीन घर मानवण्यासाठी खास तयारी केली आहे.
विलगीकरणातून बाहेर पडल्यानंतर चित्त्यांनी आता शिकार करण्यासही सुरुवात केली आहे. पाच माद्या आणि तीन नर असे ३० ते ६६ महिने वयोगटातील आठ चित्ते सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आहेत. येत्या काळात यात आणखी भर पडणार आहे.
