आरोग्यदायी जलसंजीवनी

आरोग्यदायी जलसंजीवनी

शरीराला पाण्याची असलेली गरज नेमकी किती आहे, हे ठरवणे आवश्यक असते. डिहायड्रेशन तसेच काही विशिष्ट प्रकारच्या आजारामध्ये अधिक पाणी पिण्याची सूचना डॅाक्टरांकडून दिली जाते. वयानुसार पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, ते कमी केल्यास मूतखडा होऊ शकतो. अशावेळी डाॅक्टर ‘पाणी सतत प्या,’ असा सल्ला देतात. तर काहीवेळा गर्भवती स्त्रियांना नेमके पाणी किती प्यावे हे डाॅक्टर ठरवून देतात. पाणी योग्य प्रमाणात वेळच्यावेळी प्यायल्याने पोट साफ राहते, त्यामुळे अन्य आजारांना निमंत्रण मिळत नाही. पाण्याचे महत्त्व वेळीच लक्षात घ्यायला हवे. पाणी किती प्यावे?

तिशी पार केलेल्या व्यक्तीला अंदाजे दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते. यातही प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीप्रमाणे किंवा सवयीनुसार थोडे कमी-जास्त पाणी घेत असतो. उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज अधिक असते. तर पावसाळ्यात व हिवाळ्यात मात्र आठवणीने पाणी प्यावे लागते. उन्हातान्हात काम करणारे, श्रमाची कामे करणारे, खेळाडू, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता या सर्वांनी पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवावे. वृद्ध व्यक्तींनीसुद्धा आपले दिवसभराचे पाणी एका बाजूला काढून ठेवून आठवणीने ते संपवण्याची सवय लावून घ्यावी. आपले वय जसे वाढते तसे शरीरातील पाण्याची टक्केवारी कमी होऊ लागते. शौचास त्रास होतो त्यामुळे पोट स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी अधिक प्यायला हवे.

खेळाडू व व्यायाम करणाऱ्यांनी प्रत्येक तासाच्या व्यायामाला २५०मिली मिलि अतिरिक्त पाणी प्यावे. म्हणजेच एखादा खेळाडू रोज दोन तास खेळत असेल, तर त्याचे रोजचे २५० ते ३०० मिली इतके हवे. खूप उन्हामध्ये उघड्यावर व्यायाम किंवा कष्टाचे काम असल्यास हे पाण्याचे प्रमाण वाढवून दर तासाला एक लिटरपर्यंत न्यावे लागते. घामामधून शरीरातले मीठही बाहेर पडते. त्यामुळे उन्हाच्या कामात लिंबू-मीठ-पाणी किंवा क्षारयुक्त पेय घेणे अधिक गरजेचे आहे.

अॅसिडिटी, अल्सर, शौचास साफ न होणे, मूळव्याध, मूतखडा अशा तक्रारी आहेत, त्यांनी अधिक प्रमाणात पाणी प्यावे. अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी सकाळी उठल्याबरोबर आधी चांगले ग्लासभर पाणी प्यावे. रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेऊ नये. पाणी पिण्याचा कंटाळा वाढत आहे, असेही दिसून येते. बऱ्याच शाळा-कॉलेजे किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे नसतात. त्यामुळे स्त्रिया मूत्रविर्सजन टाळण्यासाठी पाणी पित नाहीत किंवा पाणी कमी पितात. त्यामुळे युरिन इन्फेक्शनचा त्रास वाढीस लागतो. प्यायचे पाणी जंतूविरहित करायचे असल्यास प्रथम

पांढऱ्या स्वच्छ फडक्यातून गाळून घेणे. नंतर हे पाणी गरम करण्यास ठेवणे. पाण्याला उकळी आल्यानंतर पुढे दहा मिनिटे हे पाणी उकळू द्यावे व त्यानंतर ते झाकून ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *