अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणखी एक संधी; १० वी-१२ वी पुरवणी परीक्षेच्या तारखांची घोषणा, वाचा…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ९६.९४ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. ३.०६ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण देखील झालेत. त्यामुळेच मंडळाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या तारखांचीही घोषणा केलीय. यानुसार १२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलै २०२२ रोजी, तर १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. मंडळाने (MSBSHSE) दहावी निकालाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच ही माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, “१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येईल.”

 “१२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, तर १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे,” असंही मंडळाने नमूद केलं.

दहावीच्या परीक्षेत ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावी परीक्षेसाठी ९ विभागातून एकूण १५ लाख ८४ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *