राज्यावर अस्मानी संकट, मेघगर्जनेसह तब्बल २७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

दरम्यान, विदर्भातल्या काही भागांमध्ये उष्णताही जाणवू शकते. चंद्रपूर गोंदिया, वर्धा, नागपूर, ब्रह्मपुरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला असून नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागू शकतो. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान होत असून, आज (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.

उत्तर कोकण(North Konkan ) : उत्तर कोकणात आजपासून १२ जूनपर्यंत पावासाचा अंदाज देण्यात आला आहे. घाटमाथ्यावरच्या ठिकाणांवरही मुसळधार पाऊस होईल तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा(South Konkan & Goa ): दक्षिण कोकण आज आणि उद्या तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला असून १० आणि ११ जूनला बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यत आहे. तर १२ तारखेला मात्र मोजक्याच जिल्यांमध्ये पाऊस पडेल.

उत्तर मध्य महाराष्ट्र(North Madhya Maharashtra ): हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दक्षिण मध्य महाराष्ट्र(South Madhya Maharashtra ): दक्षिण मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाडा(Marathawada ): मराठवाड्यालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहिल.

 पूर्व-पश्चिम विदर्भ (East – West Vidarbha)पूर्व-पश्चिम विदर्भातही हवामान खायात्याकडून पावासाचा इशारा देण्यात आला असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचाही तडाखा बसू शकतो.

राज्यात कधी येणार मान्सून?

खरंतर, राज्यात सध्या मान्सूनची प्रतिक्षा आहे. पण मान्सूनला राज्यात येण्यासाठी विलंब होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळत होता. पण आता त्याने पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सूनने बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) पुढे चाल करत मंगळवारी (ता. ७) तमिळनाडूच्या काही भागातही प्रगती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *