आधी विष घेतलं, त्यानंतर एकमेकांना मिठी मारली आणि त्याच अवस्थेत…

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जालना रोडने झोकांड्या खात एक पुरुष व महिला येत असताना लोकांनी पाहिले. काही वेळातच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि खाली कोसळले. वांत्या करत ते रस्त्यावर हातपाय खोडत तडफडत होते. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ पोलिसांना फोन केला.

घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघांना १०८ रुग्णवाहिकेतून चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. तर सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सत्यभामा कदम या गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्या असल्याची तक्रार करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली आहे. तर बहिणीचा शोध लावण्यात करमाड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी यश आले होते. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांचाही शोध घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *