बारामतीच्या सात तरुणांचा अपघाती मृत्यू

तिरुपतीच्या दर्शनासाठी चाललेल्या बारामती तालुक्यातील सात भाविकांचा आंध्रप्रदेशात रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. भाविकांच्या स्कॉर्पिओ गाडीला कर्नुल महामार्गावर पहाटे अडीजच्या सुमारास भीषण अपघात झाला.

अपघातातील सर्व मृत वीशी-पंचविशीतील युवक आहेत. देऊळगाव रसाळ उंडवडी सुपे गावाचे हे युवक स्कॉर्पिओ गाडीने देवदर्शनासाठी तिरुपतीला निघाले होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या युवकांच्या अकाली मृत्यूच्या बातमीने गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सागर अंकुश रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, अनिल रमेश गवळी, सागर बाळासाहेब रसाळ, ऋषीकेश पोपट गवळी, शेखर बापूराव गवळी आणि मोहन दत्तात्रय गवळी अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *