सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू

अजंग येथील दोन सख्ख्या भावंडांचा विराणे येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) दुपारी घडली. हर्षल देवीदास जाधव (वय २२) व रितेश देवीदास जाधव (वय १८) असे दोघे मृत भावंडांचे नाव आहे. येवला येथे माध्यमिक शिक्षक असलेल्या देवीदास जाधव यांची ती मुले होती.

निमशेवडी येथे हर्षल आणि रितेश हे दोघे बुधवारी एका विवाह सोहळ्यासाठी दुचाकीवर गेले होते. दुपारी घरी परतत असताना, विराणे धरणाजवळ दोघे गेले. धरणकाठावरून पाय घसरल्याने रितेश बुडाला. त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ हर्षलने प्रयत्न केले. परंतु पोहता येत नसल्याने दोघेही धरणात बुडाले. दरम्यान, त्यांचा चुलत भाऊ मागून येत असताना, त्याचे दुचाकीकडे लक्ष गेल्याने हा प्रकार लक्षात आला. हर्षल हा नाशिक येथे इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला, तर रितेश हा मालेगावी मसगा महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *