सहा महिन्यांपासून पगार नसल्याने सफाई कामगारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेच्या काही सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मुख्याधिकाऱ्यांसमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने, काही लोकांनी हस्तक्षेप करत त्यांच्या हातून पेट्रोलचे कॅन हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. गेल्या सहा महिन्यांपासून पगार रखडल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्नी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

वरणगाव नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बेताची, त्यात पगार रखडल्याने सफाई कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रखडलेले पगार करावेत, यासाठी कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी नगरपालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेत जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *