नवी मुंबईतल्या खारघरमध्ये स्टेशन तसंच भारती विद्यापीठ परिसरात काही कावळे आणि साळुंख्या मृत अवस्थेत सापडल्यायत. गेल्या दोन दिवसांपासून काही कावळे आणि साळुंखी मरून पडत असल्याचं स्थनिक नागरिकांनी सांगितलंय. यामुळे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
अमरावतीच्या बडनेरामधल्या दत्तवाडी परिसरात 40 कोंबड्या दगावल्यायत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत सापडलेत. दगावलेल्या या कोंबडयांचे स्वॅब घेण्यात आले असून ते अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच कोंबड्याचा मृत्यू नेमका कशानं झाला हे स्पष्ट होणारेय.

