मेघालयातही भडकला हिंसाचार; ३ ठार

मेघालयमध्ये आदिवासी आणि स्थलांतरितांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत तीन लोकांचा बळी गेला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना तीन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर शिलाँगमध्ये संचारबंदीचा आदेश देण्यात आला. त्यानंतरही हिंसाचार थांबला नाही. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत पूर्व खासी हिल परिसरात उपहासुद्दीन या स्थलांतरिताची त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला खमाटी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

बाजारात चाकू मारत हत्या

दोन दिवसांपूर्वी खासी विद्यार्थी संघटनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात सुरु केलेले आंदोलन हिंसक झाले. या नंतर झालेल्या हिंसाचारात शुक्रवारी एक अदिवासी व्यक्ती पूर्व खासी हिल्समधील इचामतीमध्ये ठार झाला. या घटनेनंतर तेथील परिस्थिती चिघळली. या नंतर शिलाँगच्या बडा बाजार भाघात अज्ञात लोकांना चाकू मारत फिरू लागले. या घटनेत आसामहून आलेल्या एका भाजीवाल्याचा मृत्यू झाला, तर इतर ८ जण जखमी झाले.

पोलिसांनी व्यक्तीगत वैराचा संशय

दरम्यान, उपहास नावाच्या एका व्यक्तीवर तो झोपलेला असताना त्याच्यावर हल्ला केला गेला, असे पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक सी. ए. लैंगवा यांनी माहिती देताना सांगितले. हल्लेखोरांना उपहासच्या घरातील आतील भाग, आत जाण्याचा मार्ग आणि त्याचा बेडरुम या गोष्टीची संपूर्ण माहिती होती, असेही लैंगवा म्हणाले. या वरून त्याची हत्या व्यवसायावरून किंवा एखाद्या व्यक्तीगत कारणावरून झाली असावी असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *