‘अपघात’वार; दोन अपघातात १५ जण ठार

जळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रविवारी मध्यरात्री ट्रक आणि क्रूझर यांच्यात झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. चोपडा येथून येत परतत असताना क्रूझला ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

सातारा जिल्ह्यातील चितळी येथील सहा जण नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला निघाले होते. पारेकरवाडी येथून सातारा जिल्ह्यातील चितळी येथे गाडीने जात असताना गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहीर पाण्याचे भरलेली असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडणे शक्य झालं नाही आणि त्यात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. तर हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले आहेत. या अपघातात मच्छिंद्र पाटील (वय ६० वर्ष), कुंडलीक बरकडे (वय ६० वर्ष), गुंडा डोंबाळे (वय ३५ वर्ष), संगीता पाटील (वय ४० वर्ष), शोभा पाटील (वय ३८ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *