अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा खून

तालुक्यातील टाकळी परिसरात महामार्गालगत शेताजवळ आठवडाभरापूर्वी आढळून आलेल्या खुनाच्या घटनेचा उलगडा पोलिसांनी केला आहे. संदीप नाना खैरनार (रा. टाकळी ता. मालेगाव) यांचा खून झाला होता. त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने संदीपचा खून केल्याचे पोलिस तपासात स्ष्ट झाले आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

संदीप यांच्या पत्नीसह विलास यशवंत जगताप ( वय ३०, रा. चिखलओहळ, ता. मालेगाव, ह. मु. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. टाकळी शिवारात २९ डिसेंबर रोजी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली होती. अपर अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. अनैतिक संबंधांमधून खुनाचा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांना आला. संदीप यांच्या पत्नीचे चिखलओहळ येथील माहेर आहे. तेथील विलास यशवंत जगताप याच्याशी तिचे अनैतिक संबंध असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, संदीप यांची पत्नी व अन्य नातेवाइकांना चौकशीसाठी मंगळवारी (दि. ७) पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी संदीपच्या पत्नीने कॉलेजपासून विलाससोबत प्रेमसंबंध होते. संदीपसोबत विवाह झाल्यानंतर विलासच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून विलास व संदीप यांची पत्नी हे एकमेकांच्या संपर्कात आले.

संदीप घरी नसताना विलास त्याच्या घरी गेला. मात्र, त्यावेळी पती संदीप अचानक घरी आला. विलास व संदीप या दोघांमध्ये मारहाण, शिवीगाळचा प्रकार घडला. आपले प्रेमसंबध उघड होतील या भीतीने महिला आणि विलास यांनी संदीप याचा त्याच्याच घरी २८ डिसेंबर रोजी गळा आवळून खून केला आणि मृतदेह टाकळी शिवारात फेकून दिला. तसेच रात्रीच्या सुमारास घरासमोरील व्यक्ती व अन्य कुटुंबीयांना संदीप हे ड्युटीवरून घरी परतले नसल्याचा बनाव केला. दरम्यान, पोलिस पथकाने बुधवारी नाशिक येथून संशयित विलास याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने देखील संबंधित महिलेल्या मदतीने संदीपचा खून केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *