‘घाडगे अँड सून’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील ‘घाडगे अँड सून’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हा आठवडा मालिकेचा शेवटचा आठवडा असणार आहे. मालिकेनं ५०० भागांचा टप्पा पार केला असून मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. उत्तम कथानक, कलाकार यांमुळं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. घाडगे सदन आणि त्यातलं कुटुंब हे प्रेक्षकांना आपल्या कुटुंबाचा एक भाग वाटत होतं. घाडगे सदनमधील माई, अण्णा, अक्का, अक्षय , अमृता आणि कियारा ही या मालिकेतली मुख्य पात्रं. अक्षय-अमृताची केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा झाली. समंजस, विचारी माईच्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली. तर कियारा आणि वसुधा या दोघीही खलनायिकेच्या भूमिकेत उत्तम दिसल्या.

आता मालिका निरोप घेत असल्यानं सगळ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर भावना शेअर केल्या आहेत. अमृताची भूमिका साकारणारी भाग्यश्री लिमये हिनं देखील इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत भावना शेअर केल्या. भाग्यश्री ही या टीव्ही मालिकेमुळं घराघरात पोहचली. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी तिनं चाहत्यांचे आभार मानले आहेत.

अक्षयची भूमिका साकारणारा चिन्मय उदगीरकर सांगतो, ‘घाडगे & सून मालिका आता निरोप घेतेय यावर खरोखरच विश्वास बसत नाहीये… असं वाटत आहे काल परवाच शूट सुरू झालं. ही मालिका करताना आम्हाला काय गवसलं तर प्रेक्षकांचं खूप प्रेम. माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर अक्षय ही भूमिका करताना मला खूप समाधान मिळालं. कारण मी आजवर ज्या भूमिका साकारल्या, त्यापेक्षा ही खूप वेगळी आणि आव्हानात्मक होती. प्रेक्षक आता मला अकी म्हणूनच हाक मारतात… इतकी ही भूमिका त्यांना आपलीशी वाटली होती. मला या मालिकेच्या रूपात एक दुसर कुटुंबच मिळालं होतं’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *