जिवंत विद्युत तार पकडून शेतकऱ्याची आत्महत्या

कारंजा तालुक्यातील धनज खुर्द येथील एका शेतकऱ्याने जिवंत विद्युत तार (सर्व्हीस लाइन) हाती पकडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. सुरेश रामसा कट्यारमल (५५), असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

सुरेश हे गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घरात कुणालाही न सांगता शेतावर गेले. सकाळ होऊनही त्यांच्याविषयी माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शेतात त्यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्या हातात सर्व्हिस लाइनचा केबल होता. त्यांच्यावर सहकारी सोसायटीचे दीड लाखांचे कर्ज आहे. सावकाराकडूनही एक लाख घेतले आहेत. दहा एकर शेत असतानाही हे कर्ज फेडण्याइतक उत्पन्न झाले नाही. अवकाळी पावसाने उरलेली आशाही मावळली. समोर कुठलाच मार्ग दिसत नसल्याचे मागील काही दिवसांपासून बोलत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत. अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाल्याने मागील काही दिवसांत विदर्भातील शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *