गावी येण्यास नकार, पत्नीचा गळा चिरला

पुन्हा मूळ गावी जाण्याची आपलं म्हणणं न ऐकणाऱ्या पत्नीवर पतीने चाकूने वार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजवंशी ठाकुर दास (३० वर्षे, रा. जानकीनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनू हिच्या गळावर चाकूने वार केला. सुदैवाने सोनू बचावली असून जखमी झाली आहे.

 राज हा मजुरीचे काम करत असून त्याची पत्नी सोनू गृहिणी आहे. मूळ उत्तर प्रदेशातील झांशी जिल्ह्यात राज राहणारा असून सोनू ही नागपूरमधील रहिवासी आहे. लग्नानंतर हे दोघे नागपुरात राहू लागले. या जोडप्याला एक सात वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी आहे. राजची झाशी येथील गावी परत जाण्याची इच्छा होती. त्याने त्यासाठी पत्नी सोनूमागे तगादा लावला होता. मात्र पालक येथेच असल्याने सोनू गावी परत जाण्यास तयार नव्हती. यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात राजने सोनूच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सोनू गंभीर जखमी झाली.

या प्राणघातक हल्ल्यानंतर आरोपी राजू पसार झाला आहे. सध्या जखमी सोनूची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *