संतोष भुवन येथून काल अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अबु बकर या ६ वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह ओस्तवाल नगर येथे सापडला आहे. तुळीज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही माहिती दिली आहे. काल नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथून अबु बकर हा चिमुकला उघड्या गटारातून वाहून गेला होता. ही घटना घडताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले. मात्र अबु बकरचा शोध लागत नव्हता.
अबु ज्या गटारातून वाहून गेला त्या गटाराचे झाकण निघालेले होते. हे अबुच्या लक्षात न आल्याने चालता असताना तो पाण्याच्या दाबाने गटारामध्ये ओढला गेला असे सांगण्यात येत आहे.
अबुच्या मृत्यूला महापालिका जबाबदार!
आपल्या मुलाचा बळी हा महानगरपालिकेच्या बेजबदार कारभारामुळे गेल्याचा आरोप अबु बकरच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, महापालिका आपली जबाबदारी ओळखून काम करत नसल्याचे म्हणत स्थानिकांनाही महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
