सीआरपीएफच्या हेल्पलाइनवर सहा दिवसात ७ हजार फोन

सीआरपीएफने काश्मीरी जनतेच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. पण काश्मीरींच्या मदतीपेक्षा या ‘मददगार’ हेल्पलाइनमुळे पाकिस्तानी नागरिकांना आपला रोष व्यक्त करण्यासाठी एक जागा झाली आहे. हेल्पलाइनवर ११ ते १६ ऑगस्टदरम्यान ७,०७१ दूरध्वनी आले, त्यापैकी १७१ भारताबाहेरून आले होते.

काही लोक हेल्पलाइनवर फोन करून आपल्या कुटुंबीयांची चौकशी करत होते. पाकिस्तानमधून आलेल्या दूरध्वनींवर सुरक्षा दलालाच लोक अपशब्द बोलत होते. या हेल्पलाइनवर २,७०० दूरध्वनी सुरक्षा दलाच्या कुटुंबीयांकडून, २,४४८ दूरध्वनी काश्मीरबाहेर राहणाऱ्या लोकांकडून आपल्या आप्तजनांची खुशाली विचारण्यासाठी आले होते. १,७५२ दूरध्वनी बिगर काश्मीरी लोकांनी काश्मीरी लोकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आले होते.

१४४११ असा या टोल फ्री हेल्प लाइनचा नंबर आहे. सौदी अरबमधून एकूण ४५ फोन आले. एकूण २२ देशांमधून काश्मिरींची परिस्थिती जाणून घेण्यासाठी फोन आले. यापैकी ३९ युएई, १२ कुवेत, ८ इस्रायल आणि मलेशियातून तर ७ युके, सिंगापूर आणि बांगलादेशमधून फोन आले. काही फोन पाकिस्तानातूनही आले. काही नातेवाईकांची ख्यालीखुशाली विचारणारे आले तर काहींनी आपला भारतावरचा राग व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *