गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि उद्याही जोरदार पावसाची हवामान खात्याने वर्तवलेली शक्यता या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि शिर्डीमधील शाळांना आज सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विद्यापीठांनाही सुट्टी
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यालय, अहमदनगर व नाशिक उपकेंद्रे, विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांमधील सर्व संलग्न महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
