दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज ट्विटरवरून दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण युवक कल्याण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आज दुपारी ट्विटरवरून यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यांनी एकूण तीन ट्विट केले असून परीक्षा फी माफीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यसरकारचे नियम, त्यासंबंधीची सविस्तर माहिती, कोणत्या भागातील विद्यार्थ्यांना फी माफी मिळणार आहे, याची सविस्तर माहिती या ट्विटमधून देण्यात आली आहे. राज्य सरकारचे परिपत्रक आशिष शेलार यांनी ट्विटवर विद्यार्थ्यांसाठी शेअर केले आहे. दुष्काळी भागातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा माफ करताना यापूर्वी न होणाऱ्या प्रात्यक्षिक, गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व शुल्कांसह संपूर्ण फी आता माफ होणार असून प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे आशिष शेलार यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *