पावसाचे पुनरागमन ! आज ठाण्यात अतिवृष्टीचा तर कोकणात अतिमुसळधारचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं राज्यभरात पुनरागमन झालं आहे.  पालघर, ठाणे जिल्ह्य़ात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात सध्या पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात दहिसर, बोरिवली, तसेच भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई, डोंबिवली येथे दमदार पाऊस पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *