ठाण्यात आजपासून राज्यस्तरीय बौद्ध सा​हित्य संमेलन

बुध्दजयंतीच्या पर्वावर ठाणे येथील भदन्त आनंद कौसल्यायन साहित्यनगरीत १८ ते २० मेपर्यंत राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होत आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड हे भूषविणार आहेत.

उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे असून, याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक उर्मिला पवार, ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे, प्रा. इंदिरा आठवले हे उपस्थित राहणार आहेत. या बौद्ध साहित्य संमेलनात ‘बौद्ध धम्माची स्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरंची धम्मक्रांती’,’बुद्धाचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन’, ‘प्रबोधन आणि आचरणातून धम्म विचार’ आणि ‘डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म’ या विषयावर चार परिसंवाद होणार आहेत. तर, ‘बौद्ध धम्म प्रच्चार-प्रसारामध्ये साहित्यिकांची भूमिका’,’पाली साहित्यातील थेरीगाथा’,’बौद्धांचे प्रश्न आणि साहित्यिकांची भूमिका’ या विषयांवर तीन चर्चासत्र, दोन कविसंमेलन आणि कथाकथन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *