१९ दिवसांत ५६ वाहने चोरीला

शहराच्या विविध भागातून वाहन चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या १९ दिवसांत तब्बल ५६ वाहने चोरीस गेली आहेत. शहरातून सहा महिन्यात सहाशेपेक्षा जास्त वाहने चोरीस गेली आहेत. याशिवाय वाहनांच्या डिक्कीतून रोख रक्कम पळवण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. साताऱ्यासह शहरातील इतर चोऱ्यांचा पोलिस तपास संथगतीने सुरू आहे.

शहरातील वाहन व इतर चोऱ्यांचा तपास वेगाने होत नसल्याने चोरांची भीड चेपली आहे. संपूर्ण पोलिस दल रस्त्यावर असताना सुद्धा भरदिवसा कारमधून लाखो रुपयांच्या थैल्या पळवण्यात आल्या आहेत. तसेच दुचाकीच्या डिक्कीतूनही लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. हे चोरटे सीसीटीव्ही फुâटेजमध्ये दिसत असूनही त्यांना अद्याप अटक करण्यात अपयश आलेले आहे. मोंढ्यातील व्यापाऱ्याची कार पंक्चर झाल्याची थाप मारून सव्वा दोन लाख, तर सेव्हन हिल जवळ ऑइल लिकेज होत असल्याची थाप मारून पाच लाखांची रक्कम असलेली बॅग कारमधून लंपास करण्यात आली. तसचे जय टॉवर येथून एका कंत्राटदाराचे साडेचार लाख रुपये कारमधून प‌ळवण्यात आले. या पाठोपाठ समर्थनगर आणि एका बँकेसमोरून दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. या चोऱ्या करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहेत.

शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना वाहन चोरीच्या घटना ‌वाढत आहेत. गेल्या १९ दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे ५६ मोटारसायकली व तीन चाकी वाहने चोरीला गेल्याची नोंद करण्यात आलेली आहे. या चोऱ्यांच्या तपास संथगतीने सुरू आहे.
चोऱ्या व घरफोड्या वाढल्यामुळे पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखा आणि संबधित पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरम पथकाचे (डीबी पथक) कान टोचले. त्यांना दिवस-रात्र आळीपाळीने गस्त घालण्याची ताकीद देण्यात आली. त्यानंतरही चोरी, घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांत वाढ होत आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल गुरुवारी (१४ मार्च) शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पोलिस अधिकाऱ्यांची पोलिस आयुक्तालयात बैठक घेणार आहेत. ते दुपारी चार वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *