केरळमधील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. या पुरात ३२४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमधील पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्रातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी पाठवले जाणार आहे.
पुरामुळे केरळमधील नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. साधारण सात लाख लिटर पाणी केरळला रवाना केले जाणार आहे. त्याशिवाय, रतलाम रेल्वे स्थानकातून पाणी घेऊन एक गाडी पुणे स्थानकात दाखल होणार आहे. त्यानंतर दुपारी एक नंतर या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.