रत्नागिरीत कार नदीत कोसळली, चारजण बेपत्ता

संगमेश्वरच्या धामणी गावात एक इनोव्हा कार नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चारजण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेत कारचालकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले असून नदीत बेपत्ता झालेल्यांचा ग्रामस्थांनी शोध सुरू केला आहे.

संगमेश्वर येथील धामणी गावात ही घटना घडली. पावसामुळे नदीला पूर आलेला होता. एक इनोव्हा कार या पुलावरून जात असताना कारचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार नदीत कोसळली . या दुर्घटनते कारमधील चार प्रवासी बेपत्ता झाले आहेत. त्यात एका १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. कार नदीत कोसळल्याचं कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ नदीत उड्या मारत कारमधील लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी कारचालकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले असले तरी इतर चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *