शिक्षकासाठी शाळेला सरपंचानेच ठोकले कुलूप

चिंचखेडा तांडा येथील सरपंचाने  शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शाळेला कुलूप ठोकले. यामुळे विद्यार्थ्यांची व्हरांड्यातच शाळाच्या भरली.

चिंचखेडा तांडा येथे जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असून, येथे ६६ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. दोनपैकी एक शिक्षक प्रतिनियुक्तीवर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून एकाच शिक्षकावर या शाळेचा भार आहे. दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार  पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने शेवटी सरपंच वंदना राजू जाधव, लक्ष्मण जाधव, गोरख जाधव, स्थानिक पालक व ग्रामस्थानी मंगळवारी (२६ जून) सकाळी दहाच्या सुमारास शाळेला टाळे ठोकले. शाळेला कुलूप असल्याने एका शिक्षकास माघारी फिरावे लागले. याबाबत गट शिक्षण अधिकारी हुमेरा सिद्दिकी यांनी केंद्र प्रमुखांकडून अद्याप याबाबतचा अहवाल प्राप्त न झाल्याचचे सांगितले, तर ग्रामस्थांनी जोपर्यंत दुसरा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *