बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कर्नाळ येथील युवकाने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने निकालाच्या काही तास आधी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. प्रणव दूष्यंत माने (वय १८) असे त्याचे नाव आहे. निकालानंतर तो तीन विषयात नापास झाल्याचे समोर आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रणवने कर्नाळ बिसूरदरम्यान रेल्वेखाली उडी घेतली. प्रणव सांगली हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. आत्महत्येची नोंद सांगली ग्रामीण पोलिसात झाली आहे.

दुसऱ्या एका घटनेत सांगलीत बापट मळा परिसरातील बारावीच्या विद्यार्थ्याने निकालानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. ओंकार काळे असे त्याचे नाव आहे. चार विषयांत नापास झाल्याचे समजताच त्याने घरातील खिडकीला ओढणीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्याला त्वरित सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *