एटीएसकडून ९ बांगलादेशी अटकेत

मुंबईत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी व्यक्तींना गुरुवारी कांदिवली आणि मालवणी भागातून अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या एटीएस  नागपाडा युनिटने केलेल्या कारवाईत या आठही जणांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे आढळून आले आहे. त्यांचा दहशतवादी संघटनेशी काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.

कांदिवली पश्चिम आणि मालवणी भागात काही बांगलादेशी नागरिक दडून असल्याची माहिती नागपाडा पथकास मिळाली. त्यानुसार युनिटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी तपास केला असता आठ जणांचा छडा लावण्यात यश मिळवले. या आठपैकी दोघांकडे पॅन कार्ड सापडली आहेत.

अटक करण्यात आलेले सर्व बांगलादेशी कांदिवलीतील एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जुळणी करणाऱ्या व्यावसायिकाकडे नोकरी करत होते. या व्यावसायिकासह एकूण ९ जणांना अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकांचा दहशतवादी संघटनेत सक्रिय सहभाग आढळल्यानंतर एटीएसने त्यापद्धतीने तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *