५३ हजार रोजगार गमावले

नोटाबंदीनंतर प्रासंगिक किंवा हंगामी तत्त्वावर काम करणाऱ्या ५३ हजार कर्मचाऱ्यांना २०१७मध्ये रोजगार गमवावा लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी देशात १.८५ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. हा विरोधाभास केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या कामगार विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, २०१७मध्ये नियमित कामगारांमध्ये १.९७ लाख कामगारांनी वाढ झाली आहे आणि कंत्राटी कामगार २६ हजारांनी वाढले. मात्र प्रासंगिक किंवा हंगामी कामगार ५३ हजारांनी कमी झाले. स्वयंरोजगारांतर्गत मनुष्यबळ १५ हजारांनी वाढल्याचे दिसून आले.

एकूण सहा क्षेत्रांच्या कर्मचाऱ्यांमध्ये घट दिसून आली आहे. मात्र, कारखानदारी (१.०२ लाख), आरोग्य (३१ हजार), व्यापार (२९ हजार), आयटी व बीपीओ (१३ हजार), मालवाहतूक (तीन हजार), रेस्तराँ (तीन हजार), बांधकाम (दोन हजार) व शिक्षण (दोन हजार) या आठ क्षेत्रांमध्ये कंसांत दर्शवल्यानुसार कर्मचारीवाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *