खूशखबरी! मार्चनंतर मिळणार जिओची फ्री सेवा

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाली. जिओने फ्री ऑफर दिल्यानंतर एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सर्विसेसच्या किंमती कमी केल्या. किंमतीवरुन सुरु झालेलं युद्ध अजूनही थांबतांना दिसत नाही आहे. याचा फायदा ग्राहकांना होत आहे.

टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांच्या मते, मार्चनंतर ही जिओ फ्री ऑफर कायम ठेऊ शकते. रिलायंस इंडस्ट्रीज सध्या आर्थिक बाबतीत मजबूत स्थितीत आहे. जिओ यामुळे अधिक वेळ या प्राईस वॉरमध्ये राहू शकतो. रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *