विजेचा धक्का बसून कोल्हापुरात मायलेकाचा मृत्यू

पाणी भरताना विद्युत मोटारीत उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून माय-लेकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ली गावात घडली.
सकाळी पाणी आल्यामुळे घरासमोर असलेल्या नळावरून रोहित पाणी घेत होते. पाण्याचा दाब कमी असल्यामुळे त्यांनी विद्युत मोटार लावली होती. परंतु या मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने त्याचा धक्का रोहितला बसला. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आईने त्याला हात लावताच त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचा मृत्यू झाला. दोघांना त्वरीत रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुलगा व आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *