पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्याच्या आठ तारखेला नोटाबंदी निर्णय जाहीर केला होता. त्याला आता महिना पूर्ण झाला आहे. एका महिन्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या रांगा कमी झालेल्या दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त 50 दिवस कळ सोसा असं आवाहन देशवासियांना केलं होतं. मोदींच्या आवाहनाला जनतेमधून काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी विरोधकांनी मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा गदारोळ सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावं अशी मागणी केली जात आहे.