भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या सिंधू पाणी वाटप करारातील आपल्या हक्काचे पाणी वापरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्र नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. चीनचा तिबेटमधील हा सर्वात महागडा प्रकल्प असून या धरणामुळे भारताला काही धोके आहेत.
चीनकडून तिबेटमध्ये बांधले जाणारे हे धरण अनेक कारणांसाठी भारताची चिंता वाढवणारे आहे. या धरणामुळे पाणी अडवले जाणार असून, भारताचा चीनबरोबर त्यासंबंधी कोणताही करार झालेला नाही.
ब्रम्हपुत्र नदीवरील धरणामुळे अरुणाचलप्रदेशवरील आपला दावा अधिक बळकट होईल, असे चीनला वाटते.
तिबेटमधील धरणामुळे भारतातील नद्यांचा प्रवाह कमी होण्याची चिंता भारताला वाटते.
युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगी चीन धरण, कालवे आणि सिंचन प्रकल्पाचा अस्त्रासारखा वापर करु शकतो.
तिबेटवरील धरणा प्रकल्पांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्ये आसाम, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या भागांना धोका आहे. इथे पूराचे प्रमाण वाढू शकते किंवा पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो.