जुलाबावरील रामबाण-उपाय – जलसंजीवनी

जुलाबामध्ये जलसंजीवनी हे मिश्रण संजीवनीसारखे काम करते. हे मिश्रण आजारपणामध्येे लगेचच चालू करणे आवश्यक असते. हे बाळाचे शरीरातील कमी झालेले पाणी वाढवते व बाळाच्या अंगातील क्षारांचे समतोल राखते. यामुळे आजारपणाचे दिवस व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते.
  जगात व भारतात जुलाबामुळे लहान मुलांमध्ये आजारपण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. जलसंजीवनी मिश्रणाचे या उपचारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात जुलाब हे अस्वच्छ राहणीमान, अस्वच्छ पाणी किंवा अन्न, जेवणाआधी किंवा शौचानंतर हात न धुणे अशा गोष्टीमुळे पसरतात. पावसाळ्यात हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.
लक्षणे ः यामध्ये बाळाला उलट्या होणे, ताप येणे, पातळ संडास होणे ही लक्षणे असतात. त्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊन बाळाचे डोळे खोल जाणे, ओठ सुकणे, रडल्यानंतर अश्रू कमी येणे, टाळू आत जाणे, मुल जास्त रडणे अथवा सुस्त होणे, श्‍वासोच्छ्वासाची गती जास्त होणे, लघवी कमी होणे, संडासमधून शेम वा रक्त पडणे. यामुळे बाळ शुष्क पडून बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. यावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
 वारंवार होणार्‍या जुलाबामुळे बाळ कुपोषित होऊ शकते.
जुलाबामध्ये जलसंजीवनी हे मिश्रण संजीवनीसारखे काम करते. हे मिश्रण आजारपणामुळे लगेचच चालू करणे आवश्यक असते. हे बाळाचे शरीरातील कमी झालेले पाणी वाढवते व बाळाच्या अंगातील क्षारांचे समतोल राखते. यामुळे आजारपणाचे दिवस व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते.
 कृती ः जलसंजीवनी मिश्रणाचे छोटे पाकीट (200 ाश्र) 1 ग्लास किंवा मोठे पाकीट 1 लिटर (तांब्याभर) पिण्याच्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून मिश्रण बनवावे व हे पाणी जेवढ्या प्रमाणात जुलाब होत आहेत तेवढ्या प्रमाणात पाजावे. हे मिश्रण बनवताना पाण्याचे प्रमाण कमी अथवा जास्त झाल्यास बाळाला आवश्यक तो फायदा न मिळता अपाय होण्याची शक्यता असते.
 24 तासानंतर राहिलेले मिश्रण फेकून देऊन नवीन मिश्रण बनवून पाजणे. या मिश्रणाबरोबरच मिठयुक्त ताक, भाताची पेज, नारळाचे पाणी आपण देऊ शकतो. परंतु चहा, कॉफी, फळांचे रस देऊ नये. या उपचारादरम्यान आईचे दूध बंद करू नये व झिंक हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करावे. यामुळे बाळ लवकर बरे होण्यास मदत होते व आतड्यांची झीज लवकर भरून येते.
िीर्शींशपींळेप ळी लशीींंशी ींहरप र्लीीश अर्थात जुलाब होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी.
 वैयक्तिक स्वच्छता, जेवणाआधी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे. फळे व पालेभाज्या स्वच्छ धुवून खाणे. बाहेरचे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये व पाणी उकळून पिणे. या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *