जव्हार -शेतक-याची यशोगाथा

जव्हार तालुक्यातलं वनवासी हे एक आदिवासी गाव..आदिवासी गाव असलं तरी हे संपूर्ण बागायती आहे. अगोदर या गावचा उदरनिर्वाह वनसंपत्तीच्या आधारावर चालत होता. मात्र आता हे गाव स्वयंपूर्ण झालंय. इथला आदिवासी शेतकरी समृद्ध झालाय. आणि गावकरीही महिन्याला बैठक घेऊन चांगला प्रयोग करणा•ऱ्या शेतक•याचं कौतुक करतात.

निसर्गाच्या कुशीत झाडाझुडपांमध्ये वसलेलं हे जव्हार तालुक्यातलं हे वनवासी गाव.. आजुबाजुला हिरवेगार डोंगर आणि वा•याच्या झुळुकेवर ताल धरणारी नारळाची झाडं… वनवासी गावच्या परिसरावर एक नजर फिरवली की या गावची समृद्धी आपल्या लक्षात येईल. या गावात तुम्हाला केळी, नारळ, आंबा, चिकू, पपई अशा अनेक फळबागा पाहायला मिळतील.

वनवासी गावातले शेतकरी गणपत गावंडा यांनी तर आपल्या शेतात चक्क काळ्यामिऱ्यांची लागवड केलीय. या काळ्यामि•यांचे वेल त्यांनी नारळाच्या झाडांवर चढवलेत. नारळाच्या आळ्याभोवती अननसाची लागवड करण्यात आलीय. कमी जागेत आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे आपल्याया गणपत गावंढा यांनी दाखवून दिलंय.

वनवासी या गावात मोग•याचीही सर्वात जास्त लागवड केली जाते. या गावातून हंगामामध्ये दिवसाकाठी जवळपास 2 ते 3 क्विंटल मोग•याचं उत्पन्न घेतलं जातं. दादर मार्केटमध्ये या मोग•याला चांगली मागणीही आहे. कोणत्याही एका पिकावर अवलंबुन न राहता बहुपिक पद्धतीचा अवलंब केला तर शेतक•याला नक्कीच फायदा मिळेल. एका पिकातून जर नुकसान झालं तर ते दुस•या पिकातून शेतक•ऱ्यांना भरून काढता येऊ शकता. या बहुपिक पद्धतीचा आदर्श जव्हारच्या या वनवासी गावाने घालून दिलीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *