जयपूर- राजस्थानच्या विविध भागात मंगळवारी झालेल्या धुळीच्या वादळात सात ठार तर ११ जण जखमी झाला आहे. बिकानेर व भरतपूरच्या ग्रामीण भागात या वादळामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
भरतपूरच्या ग्रामीण भागात पाच जण मरण पावले आणि चार जण जखमी झाले. तर बिकानेर भागात दोन जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.