उत्तराखंड येथील केदारनाथ बद्रीनाथ परिसरात झालेल्या महाप्रलयाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. 16 जून 2014 ला केदारनाथ परिसरात महाप्रलय आला होता.
या महापुरात हजारो भाविकांचा बळी गेले. शेकडो जखमी, अनेक जण बेघर, तर काही लोक बेपत्ताही झाले. तसेच या महाप्रलयात तेथील रस्ते आणि मंदिरांची अतोनात हानी झाली.
या धक्क्यातून उत्तराखंड हळूहळू सावरु लागलं आहे. मात्र, दोन वर्ष उलटल्यानंतरही या महाप्रलयाच्या लाटा लोकांच्या मनावर आघात करीत आहेत.

