गणपतीचा महाप्रसाद बनविण्यावरुन वाद, तरुणीने गमावला जीव

गणपतीचा महाप्रसाद बनविण्यावरुन झालेल्या वादात धक्का लागल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथे घडली.

मनिषा किशोर मसराम (२७) असे निधन झालेल्या तरुणीचे नाव आहे. छावनी येथील हनुमान मंदिराच्या गणेशोत्सव मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त बुधवारी रात्री महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. महाप्रसाद करण्याच्या जागेवरून मनिषाचा भाऊ लोकेश याचे दुसऱ्या तरुणाबरोबर भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी मनिषा मध्ये पडली. दरम्यान दर्शनचा मनिषाला धक्का लागल्याने तोल जाऊन पडली आणि ती बेशुद्ध पडली.

कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मृत्यप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *