विवाहामध्ये मोटार न दिल्याने चिडलेल्या नवरदेवाने विवाहानंतर अवघ्य दोन तासातच तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे.
भगवानपूर येथील मोहम्मद अरिफ याचा दोहा गावातील युवतीशी विवाह ठरला होता. मोठ्या उत्साहात विवाह पार पडला. मोहम्मदने मोटारीची मागणी केली होती. परंतु, विवाह झाल्यानंतर मोटार न मिळाल्यामुळे तो युवतीला शिवीगाळ करू लागला. चिडलेल्या मोहम्मदने विवाहस्थळीच तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला, असे युवतीचे काका युसूफ अहमद यांनी दिली.
दोघांमध्ये तलाक झाल्यानंतर प्रकरण पंचायतीपुढे गेले. पंचायतीने मोहम्मद अरिफला 2.25 लाख नुकसान भरपाई व तीन वर्षे त्याला कोणीही मुलगी देऊ नये, अशी बंदी घालण्यात आली आहे.