वर्ध्यात वायगाव-निपाणी इथल्या संस्कार अॅग्रो प्रोसेसिंग युनिटला मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मदत कार्य अजून सुरू असून आगीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

