49 जणांना डेंग्यू

शहर परिसरात आठ ते दहा दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, 49 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूने दोन जणांचा बळी गेला आहे. मलेरिया, ताप, काविळ ,जुलाब,थंडी, ज्वर , खोकला, कावीळ, डेंग्यू आदीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान 3 हजार 342 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये मलेरिया- 434, व्हायरल इन्फेशन 450, जुलाब 8, कावीळ 37, डेंग्यू – 1 आदी आजाराचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नाशिक पूर्व विभागातील सरकारी दवाखान्यातील 6 व खासगी दवाखान्यातील 43 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

डेंग्यूमुळे काठे गल्लीतील राजेश शर्मा व वडाळा गावातील 8 वषीय आरुषी शेख या दोन रुग्णांचा मुत्यू झाला आहे. सर्व रुग्ण इंदिरानगर, राजीवनगर, वडाळागावातील आहे .

पाण्याचा जास्त दिवस साठा करू नये. पाणी गाळून व उकळून प्यावे. थकवा जाणवल्यास रुग्णालयात जावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *