शहर परिसरात आठ ते दहा दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, 49 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूने दोन जणांचा बळी गेला आहे. मलेरिया, ताप, काविळ ,जुलाब,थंडी, ज्वर , खोकला, कावीळ, डेंग्यू आदीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान 3 हजार 342 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये मलेरिया- 434, व्हायरल इन्फेशन 450, जुलाब 8, कावीळ 37, डेंग्यू – 1 आदी आजाराचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नाशिक पूर्व विभागातील सरकारी दवाखान्यातील 6 व खासगी दवाखान्यातील 43 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
डेंग्यूमुळे काठे गल्लीतील राजेश शर्मा व वडाळा गावातील 8 वषीय आरुषी शेख या दोन रुग्णांचा मुत्यू झाला आहे. सर्व रुग्ण इंदिरानगर, राजीवनगर, वडाळागावातील आहे .
पाण्याचा जास्त दिवस साठा करू नये. पाणी गाळून व उकळून प्यावे. थकवा जाणवल्यास रुग्णालयात जावे.