धुळ्यात भीषण अपघात, १६ ठार

सुरत-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक आणि वडापमध्ये धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामुळे सुरत-नागपूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.

धुळ्यात सुरत-नागपूर महामार्गावरील काटकर फाट्याजवळ अवैध वाहतूक करणा-या वडापला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला.

अवैध वाहतुकीमुळे हा भीषण अपघात झाला असून वडापमध्ये ८ ते १० माणसे बसण्याची व्यवस्था असतानाही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरली गेले आणि त्याचा परिणाम होऊन अपघाता झाला व १६ निष्पापांना जीव गमवावा लागला.

या अपघातामुळे गेल्या दोन अडीच तासांपासून सुरत-नागपूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *