अनुराग कश्यपचा बॉलिवूडला रामराम

अनुराग कश्यपचा बॉलिवूडला रामराम

बॉम्बे वेल्वेट चित्रपट आपटल्याने निराश झालेला निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप अखेर बॉलिवूडला रामराम ठोकणार आहे. अनुराग भारत सोडून लवकरच पॅरीसमध्ये स्थायिक होणार आहे. गेल्यावर्षीही अशा प्रकारचं वृत्त होतं. पण यावेळी अनुरागनेच याला दुजोरा दिला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. ब्लॅक फ्रायडे, गँग्ज ऑफ वासेपूर, अगली आणि नुकताच प्रदर्शित झालेला बॉम्बे वेल्वेट या सारखे सिनेमे अनुराने दिग्दर्शित केलेत.

अनुराग कश्यपने पॅरीसमध्ये एका अपार्टमेंटमध्ये घरही घेतलं आहे. आणि या महिन्यातच तो पॅरीसला शिफ्ट होणार आहे. फॅन्टम फिल्मस् मधील त्याची तिघांबरोबरची भागिदारी कायम राहणार आहे. तसंच अनुराग कश्यप फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेड (AKFPL) या कंपनीचा कारभार गीता मोंगा सांभाळणार आहे.

‘मला नव्याने सुरूवात करायची आहे. मला अशा ठिकाणी जायचं जिथे चित्रपटांवर लोकांची फारशी बंधनं नसतील. मला स्वतःला पुढे न्यायचं आहे. मला मर्यादा आल्या आहेत. आणि इथे राहून मी स्वतःला पुढे नेऊ शकणार नाही’, असं अनुरागने सांगितलं. इतरांपेक्षा कायम वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणाऱ्या अनुरागला सेन्सॉर बोर्डाच्या नव्या नियमांमुळे फटका बसला आहे. त्यामुळे तो देश सोडून जातोय, असं सांगण्यात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *