ट्रक-जीपच्या अपघातात एकाच कुटुंबातील ११ ठार

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात ट्रक आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ११ जण ठार झाले. शुक्रवारी रात्री पावणेएकच्या सुमारास हा अपघात झाला. केलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाला.
मृतांमध्ये चार महिला आणि पाच मुलांचा समावेश आहे. अपघातातील सर्व मृत कुंभालगडमधील केडीया गावचे रहिवासी होते. भिलवाडा येथील साखरपुडा सोहळा आटोपून हे सर्वजण घराच्या दिशेने परतत असताना ट्रक आणि जीपची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.
ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक तिथेच सोडून पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *