पुण्यात विविध भागांमध्ये जळितकांडाचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. शुक्रवारी पहाटे सहा दुचाकी जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली. पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात हा प्रकार घडला आहे.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ येथील पोलीस ठाण्यासमोर वाहनांना आग लागल्याचा फोन आला. पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
काही वेळातच ही आग विझवण्यात जवानांना यश आले. पण तोपर्यंत सर्व दुचाकी आगीत जळून खाक झाल्या होत्या.
ज्या परिसरात हा प्रकार घडला तेथे सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ही आग कोणी लावली याचा शोध लवकरच लागेल, अशी माहिती पोलिसांकडून मिळते.
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात हे जळीतकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.