भारतीय मान्सूनचे अचूक टायमिंग कळणार

भारतीय मान्सूनचे अचूक टायमिंग कळणार

भारतातील मान्सून अत्यंत बेभरवशाचा. तो कधी पडणार? किती पडणार? याची शाश्वती भल्याभल्यांना लागत नाही. या भारतीय मान्सूनचा अभ्यास करून त्याचे अचूक ‘टायमिंग’ वर्तवण्याची किमया जर्मन संशोधकांनी केली आहे. त्यामुळे मान्सून कधी येणार व कधी जाणार याची अचूक माहिती आता भारताला मिळणार आहे. त्यामुळे पीक व जलविद्युत प्रकल्पांना मोठा मदत मिळणार आहे.

जर्मनीतील पोटस्डॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चच्या वेरोनिका स्टोलबोवा म्हणाल्या की, आम्ही मान्सूनचे भाकीत दोन आठवडे आधी वर्तवू शकतो. तर तो कधी संपणार याचे भाकीत सहा आठवडे आधीच सांगू शकतो. प्रादेशिक हवामान माहितीच्या विश्लेषणावर ही पद्धत अवलंबून आहे. हे संशोधक लवकरच आपले मॉडेल भारतीय हवामान खात्याला सादर करतील.

उत्तर पाकिस्तान व पूर्व घाट हा डोंगराळ प्रदेश हिंदी महासागराच्या जवळ आहे. तापमानातील बदल व उष्म्याच्या प्रमाणामुळे मान्सूनमध्ये बदल होतो. भारतात पारंपरिकपणे केरळमधील मान्सूनच्या आगमनावर लक्ष केंद्रीत केले जाते. पावसाची अचूक वेळ ही भाताच्या पिकासाठी आवश्यक असते.

तसेच जलविद्युत प्रकल्पासाठी ते महत्वाचे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.भारतीय शेतक-यांसाठी मान्सूनचे ‘टायमिंग’ अत्यंत महत्वाचे आहे. भात, सोयाबीन, कापूस या पिकांसाठी मान्सून आवश्यक असतो. मान्सूनच्या फरकामुळे पूर किंवा दुष्काळ पडू शकतो. जलविद्युत प्रकल्पाचे पूर्ण नियोजन मान्सूनवर अवलंबून असते, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *