स्वातंत्र्यानंतर तेथे प्रथमच पोचेल नळाचे पाणी!

स्वातंत्र्यानंतर तेथे प्रथमच पोचेल नळाचे पाणी!

राजस्थानमधील अजमेर शहराजवळील हातीखेडा, अजयसर आणि खरेखडी या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळाला पाणी पोचणार असून त्यासाठीच्या पेयजल प्रकल्पाचे नुकताच भूमीपूजन समारंभ झाला आहे.

राजस्थानमधील मंत्री किरण माहेश्‍वरी आणि शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी गुरुवारी हाथीखेडा येथे पेयजल प्रकल्पाचे योजनेचे भूमीपूजन केले. या प्रकल्पाद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी उभारून जलवाहिनी सुरू करण्यात येणार आहे. एकूण 8.9 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच या तीनही गावांना नळाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. या परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री गांभीर्याने प्रयत्नशील असल्याचे माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *