सह्याद्रीच्या पर्वतरांगातील रतनगडच्या धोकादायक टोकावरून घेतलेला ‘सेल्फी’ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. पण त्यामुळे सेल्फी महत्वाचा की सेफ्टी हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सह्याद्रीच्या रांगांमधल्या रतनगडवरचा हा भन्नाट सेल्फी आहे. पुण्याच्या प्रतीक खर्डेकर या ट्रेकरने हा फोटो फेसबुकवर टाकताच; टिकेचा भडिमार सुरू झाला आहे. अशा सेल्फींमुळे अनावश्यक साहसाला खतपाणी घातले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हा फोटो ट्रेकर्सना चिथावण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, एकीकडे टिकेचा भडिमार सुरू असताना, काही ट्रेकर्स मात्र बचावासाठी पुढे आले आहेत. ही फोटोग्राफीची कमाल असू शकेल, असे या ट्रेकर्सचे म्हणणे आहे. सेल्फीच्या नादात बँड स्टँडच्या समुद्रात दोघांचा जीव गेला होता. या पार्श्वभूमीवर हा सेल्फीही चर्चेचा विषय ठरला आहे.